
रविवार, १५ नोव्हेंबर, २००९
FUNNY SMS
संजीवनी आणू शकतोस का ?
छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?
नाही ना?
... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!
------------------------------------------------------------------
ट्रिंग ट्रिंग
हॅलो
हॅलो, प्रकाश आहे का?
नाही.
मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
------------------------------------------------------------------
जेव्हा तुला अगदी एकट वाटेल
नजरे समोर धुक वाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
सगळं जग अंधुक होऊन जाईल
तेव्हा तू माझ्या कडे ये
मे तुला
डोळ्यांच्या डॉक्टर कडे घेऊन जाईन
-----------------------------------------------------------------
लाल पिवळी कोंबडी
तिचे तिचे करडे करडे पाय
बरेच दिवस झाले तुमचा SMS येत नाय
तुम्हाला बर्ड फ्लू झाला की काय..
-----------------------------------------------------------------
प्रिय
मी फुले मागितली
तू मला पुष्पगुच्छ दिला
मी दगड मागितला
तू मला सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितली
तू मला मोर दिलास
बहिरी आहेस की काय ?
-----------------------------------------------------------------
जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस
----------------------------------------------------------------
http://marathi-emails.blogspot.com/
रविवार, ८ नोव्हेंबर, २००९
माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी॥
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो॥ आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलोपण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
आपली आवक वाढली पण नियत कमी झाली
संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली
हा काळ उंच माणसांचा पण खुज्या व्यक्तीमत्वांचा
उदंड फायद्याचा पण उथळ नात्यांचा
जागतीक शांततेच्या गप्पांचापण घरातल्या युद्धांचा
मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गेलेली
विविध खाद्यप्रकार पण त्यातली सत्व गेलेली
दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले
घरं नटली पण घरकुलं दुभंगली
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं
पण कोठीची खोली रिकामीच
हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे
पण आज आहे तुमचं स्वातंत्र्यही
या पत्राकडे लक्षदेण्याचं किंवा न देण्याचं
यातलं काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा
कवी : दलाई लामा
अनुवाद : शोभा भागवत
शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २००९
प्रेमात पडलं की
प्रेम ..
प्रेम ...
-------------------------------------------------------------------------------------
"प्रेम".... शब्द दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि उच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो.
-------------------------------------------------------------------------------------
मी आज..माज़या बापाला रडतांना पाहिले ....
सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९
हास्यविनोद ....
जवान - ''माफ कीजिये सर, मगर बात यह है कि जब दो घूंट मेरे अन्दर पहुंच जाते हैं तो मैं अपने आपको कर्नल समझने लगता हूं।''
-----------------------------------------------------------------------------------------------------------
पत्नी - चलो आज बाहर घूमने चलते हैं । और हां, गाड़ी मैं ड्राइव करूंगी ।
पति - अच्छा ! इसका मतलब जाएंगे कार में और आएंगे अखबार में .....
--------------------------------------------------------------------------------------------------------------
एक दिन दो पुराने दोस्त गधे बाजार में मिले। एक गधा बोला - यार तुम तो बहुत कमजोर हो गए हो। क्या तुम्हारा मालिक तुम्हें ठीक से खाने पीने को नहीं देता ?
दूसरे गधे ने ठंडी सांस भरकर कहा - हां दोस्त, खाने पीने को तो ठीक से मिलता ही नहीं है साथ ही काम भी बहुत करवाता है। मेरा मालिक सचमुच बहुत खराब आदमी है।
पहले गधे ने कहा - तो फिर ऐसे मालिक को तुम छोड़ क्यों नहीं देते ? किसी दिन मौका देखकर भाग जाओ न ?
दूसरा गधा - मैं भाग नहीं सकता ।
पहला गधा - पर क्यों ?
दूसरा गधा - मेरे मालिक की एक बहुत ही खूबसूरत बेटी है। जब भी वह उस पर नाराज होता है तो मेरी तरफ इशारा करके उससे कहता है कि ''देखना, एक दिन तेरी शादी मैं इस गधे से कर दूंगा'' ....... अब यार, मैं उस दिन का इंतजार कर रहा हूं ......
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
शुक्रवार, १४ ऑगस्ट, २००९
तु....
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........
रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना............ ....
आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना............ ........
अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना............ .......
झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना............ ....
माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना............ ..
विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना............ .........
शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना............ ...
सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना............ ..
आळवू मी तरी सुखास किती ?
जीवनाची कथा उदास किती
दूर गेलीस तू.. निघून जरी...
दरवळे गंध... आसपास किती
चौकटीचे कुठे असे.. जगणे...
जीवनाला परीघ्-व्यास किती
गंध गेला... उडून पार जरी...
मी जपावे जुन्या फुलास किती ?
ऐकतो... पाहुण्यांस मान इथे
बंद दारेच स्वागतास किती !
सूर माझ्यामधून... दूर अता...
आळवू मी तरी सुखास किती ?
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी
कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काही
पराभव
फ़ार काहि नाही डोळ्यांचा काठ तेवढा पाणवला....
वाटेवर होत्या तिच्या पाउलखुणा
मनातं मात्र त्यांचा अभाव जाणावला....
कधिकाळी होतीस ती बेधुंद लाट
आज तिच्या वागण्यात मर्यादितपणा जाणावला.........
कधितरी राज्यं करायचो शब्दांच्या जगावर
तरी का आज आमच्या संभाशणात शब्दांचा अभाव जाणावला..........
माझ्या हातातिल तिझा हात जेव्हा तीन सावधपणे सोडवला
तेव्हाच आमच्या नात्यातिल पवित्रपनाचा पराभव जाणावला....
मैत्री आणि प्रेम नाण्याच्या दोन बाजु
तरी प्रेमापुढे मैत्रिचा झालेला पराभव जाणावला....
हे प्रेम आहे
तर हे प्रेम नाही हा तर मोह.....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना....!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...!
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...!
जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम....!
जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,
तर ते आहे प्रेम....!
जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,
तर ते आहे प्रेम....!
जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता
पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,
तर ते आहे प्रेम.
आपले आई वडील वृद्ध होतात तेंव्हा .....
तुझी उणीव भासतेय
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे
फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस
एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही
मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही
मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस
मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस
बरंच काही निघून गेलयं
तरीही मी उभाच आहे
अर्थ सर्वच संपून गेलाय
तरीही जीवन सुरुच आहे
वेळ केव्हा निघून गेली
मला कधी कळलेच नाही
कळले जेव्हा मला तेव्हा
हाती काहीच उरले नाही
आता सर्व शांत झालयं
वादळानंतर होत तसं
पाऊसही थांबलाय आता
श्रावणानंतर होत तसं
तरीही,
बरंच काही शिल्लक आहे
अजून माझ्या हाती
काही शण अजूनही आहेत
फक्त माझ्यासाठी
त्यावरच तर जगतो आहे
हसतो आणि रडतो आहे
एकच गोष्ट फक्त मी
माझ्याकडची हरलो
प्रत्येक शणी आजही मी
फक्त तुझ्यासाठी झुरलो
आजही मला एकच फक्त
सांगावेसे वाटते
आयुष्याच्या या शणीही
तुझी उणीव भासतेय
तुझी
विनोद
द. मा. मिरासदारांचा किस्सा.
हा किस्सा मा. द. मा. मिरासदारांनी काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील एका भाषणात सांगितला होता.
अनेक वर्षापूर्वी द. मा. एका वृत्तपत्रात नोकरी करत होते. एका बातमीत वाक्य होते की 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी ओवाळले.' छापताना हे वाक्य 'मा. शरद पवार यांचे विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांना २५ सुवासिनींनी आवळले.' असे छापले गेले! हे ऐकताच त्या दिवशी सभागृहात हास्याचा स्फोट झाला.
तो जरा विरतो न विरतो तर द. मां. नी आणखी एक स्फोट केला. ते म्हणाले 'अहो, शरद पवार यांचे 'आकारमान' लक्षात घेता आवळायला २५ जणी लागणारच!'
यानंतर उसळलेल्या हास्याने सभागृहाचे छत कोसळायचेच बाकी होते.
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात
हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..
सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..
जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात
चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..
सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..
वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात
आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......
घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र र्रर्र र्र घुर्र र्र र्रघुर्र्घुर्र्घुर्र
खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......
खरं तर खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......
मनाशी सौदा असतो
पण चेहरयावर मुखवटे नाचवतात,
चेहरया मागे कुणी दुसरचं असतं
पण चेहरे खरे भासवतात....
प्रेम म्हणजे खरचं कुणीतरी आपलसं होणं
कुणाच्यातरी मनाच्या सौंदर्यावर् मनापासुन मरणं,
कधी होकाराचा विचार न करता
कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं....
पण,वर-वरच्या सुंदरतेचे आकर्षण असलेले सगळे
मनाच्या सौंदर्याला इथे विचारत कोण?
क्षणिक सुखाचे भाविक सारे
मनाच्या वाटेवर सांगा घसरतं कोण?
खरचं......
आजकाल नखरेवाल्यांचा भावचं मुळी वाढला आहे,
मनाचा फाटकेपणा लपवण्यासाठी प्रत्येकाने खोटा पडदा चेहरयावर ओढला आहे,
खरं तर खरया प्रेमाचा कणाचं मोडला आहे......
आठवण
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेन
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेन
खुप दिवसानंतर
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!
तोच आवाज, तीच वाक्य, तीच बोलण्याचे शैली,
जशी वेगवेगळ्या रत्नांनी भरलेली एखादी थैली,
वाटलं असंच तु बोलत राहावस,
माझ्या कानात गोड हसत राहावस!
तुलाही कदाचित वाटलं असेल,
पण घरच्यांपुढे कदाचित जमलं नसेल,
मनात नसताना फोन ठेवला असेल,
अजुन बोलण्याची इच्छा मनी नक्किच असेल!
वाट पाहिन मी तुझी, तुझ्या गोड आवाजाची,
आठवण मला नेहमीच राहिल या गोड क्षणांची,
का देऊ मी याला उपमा इतर कशाची,
माहितच आहे तुला अवस्था माझ्या मनाची!
इच्छा झाली होती काहितरी विचारायची,
तुलाही आवड होती काहितरी ऐकायची,
पण ओठांमध्ये शक्ती नव्हती बोलायची,
मनालाही आवड होती अग्निपरिक्षेची!!
स्वप्नांत तुझ्या जरूर येईन
कधीच स्वप्नं दाखवणार नाही
तुला घेऊन भरारी घेईन, याहून
अधीक पंख फाकवणार नाही
चंद्र, तारे चरणी वाहीन, असं
कधीच वचन देणार नाही
अशक्यातलं "अ" काढलं म्हणून
अशक्य शक्य होणार नाही
अंथ्रुना बाहेर जातील असं
पायांना पसरवणार नाही
शेवटी मध्यमवर्गीय आहे
हे कधीच विसरणार नाही
समाधानाच्या पुढे कधीच
इच्छेची गती ठेवणार नाही
चारबाय आठच्या खोलीत
राजवाड्याचा दरवाजा मावणार नाही
माझ्यापाशी प्रेम व काळजी
ह्या गोष्टींची कोणतीच सीमा नाही
अगणित हृदय शोधून बघ
इतकं प्रमाण कुठेच जमा नाही
हे सारं तुला मान्य असेल, तर
आहे त्या स्थितीत स्विकार कर
फक्तं माझचं स्वप्न पाहीलं असशील
तर, निसंकोच ते साकार कर
माझी आणि आयुष्याची एकदा स्पर्धा लागली
स्पर्धा लागली
जिंकलो तर हवं ते मिळेल अशी
पैज ठरली
पण मी हरलो
म्हणून मला आयुष्याकडून
काहीच नकोय !
सर्वांनी आयुष्यात खूप
काही दिलं
पण नशीबाने सर्व काही नेलं
आयुष्य आणि नशीब यांचा
जीवघेणा खेळ आता मला कळला
म्हणून मला आयुष्याकडून
काहीच नकोय !
ज्यांचा कधी विचारच केला
नव्हता त्यांनी हात दिला
आणि ज्यांच्याकडून अपेक्षा
केली त्यांनी अपेक्षाभंग केला
झाल इथे परत नशीबच आडव आल
म्हणून मला आयुष्याकडून
काहीच नकोय !
तरीही ते म्हणालं 'ही घे
अजून एक संधी'
पण नशीब सोबत नाही याची मला
पूर्ण खात्री
म्हणून मला आयुष्याकडून
काहीच नकोय
खरचं काहीच नकोय !!
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
तिची कविता
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!
माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!
तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!
सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!
शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!